Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणापासून पूजेपर्यंत केळीचे पान का खास आहे? जाणून घ्या; परंपरा आणि फायदे

Webdunia
बुधवार, 3 सप्टेंबर 2025 (15:31 IST)
केळीच्या पानावर जेवणाचे धार्मिक महत्व आणि आरोग्यदायी फायदे खूप आहे. केळीच्या पानावर जेवण वाढणे ही केवळ परंपराच नाही, तर ती आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. तसेच केळीच्या पानाला खूप महत्व आहे. चला तर जाणून घेऊ या केळीचे पान का खास आहे.

धार्मिक महत्त्व-
हिंदू धर्मात केळीचे पान पवित्र मानले जाते. याचा उपयोग पूजा, हवन, आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो. पानावर जेवण सर्व्ह करणे शुभ आणि पवित्र समजले जाते. तसेच केळीचे पान भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्याशी जोडलेले आहे. अनेकदा भगवान गणेश आणि अन्य देवतांना केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण केला जातो.

परंपरा आणि संस्कृती-
दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात, सण, विवाह, आणि इतर शुभ प्रसंगी केळीच्या पानावर जेवण वाढण्याची प्रथा आहे. यामुळे समारंभाला शुभता प्राप्त होते. तसेच केळीचे पान नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे, जे प्रकृतीशी एकरूप होण्याचे प्रतीक आहे.

आरोग्यदायी फायदे-
केळीचे पान बायोडिग्रेडेबल आहे, ज्यामुळे प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यांपेक्षा ते पर्यावरणाला हानिकारक नाही. केळीच्या पानात कोणतेही रासायनिक पदार्थ नसतात, त्यामुळे जेवण सुरक्षित आणि शुद्ध राहते.तसेच केळीच्या पानात पॉलिफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे जेवणाच्या संपर्कात आल्यावर अन्नात मिसळून शरीराला फायदा पोहोचवतात. हे अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. केळीच्या पानात नैसर्गिक बॅक्टेरियारोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे अन्न दीर्घकाळ ताजे राहते आणि पचनक्रियेला मदत होते. तसेच पानाच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक मेण आणि रसायने पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. केळीच्या पानावर जेवण वाढल्याने अन्नाला एक विशिष्ट सुगंध आणि चव येते, ज्यामुळे भोजनाचा आनंद वाढतो.

फायदे-
केळीचे पान एकदा वापरून जैविक खत म्हणून वापरता येते, ज्यामुळे स्वच्छता राखली जाते.
पानामुळे जेवण जास्त काळ गरम राहते, विशेषतः पारंपरिक पदार्थ जसे की भात, सांबार, आणि रस्सा.
सौंदर्यशास्त्र: केळीच्या पानावर जेवण वाढल्याने दिसायला आकर्षक आणि पारंपरिक वाटते, ज्यामुळे भोजनाचा अनुभव समृद्ध होतो.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
पान स्वच्छ धुवून वापरावे, जेणेकरून धूळ किंवा कीटकनाशके नसतील.
केळीचे पान ताजे आणि हिरवे असावे, ज्यामुळे त्याचे गुणधर्म टिकून राहतात.
ALSO READ: विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन गणेश स्थापित करणे का आवश्यक आहे, श्रद्धा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शारदीय नवरात्र 2025: सप्तमीला देवी कालरात्रीचे रहस्य

रविवारी करा आरती सूर्याची

Shri Sai Chalisa साई चालीसा स्मरण केल्याने साई कृपा प्राप्त होते

महिषासुरमर्दिनी स्तोत्र अय गिरिनंदिनी नंदितमेदिनी

Kalratri Devi Katha कालरात्री देवी कथा

सर्व पहा

नक्की वाचा

दसऱ्याला घरी झाडू आणा, सौभाग्याचे दरवाजे उघडा !

रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला सांगितलेली ३ रहस्ये - आजही तितकीच प्रासंगिक

घरात ही दोन झाडे सोबत लावल्याने नक्कीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

कडूलिंबामुळे स्कॅल्पच्या संसर्गापासून सुटका मिळते, कसे वापराल

मासे खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नका, ते घातक ठरू शकते

पुढील लेख
Show comments