Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपालांना हटवण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी

Webdunia
महाराष्ट्रातील एकूण घडामोडी पाहता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. जनतेचा घटनेवरचा, लोकशाहीवरचा विश्वास कायम राखायचा असेल तर राष्ट्रपती आणि राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावी आणि याची स्वत:हून राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी, अशी विनंती समितीने केली आहे.
  
कोश्यारी हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले आहेत. एका राज्याचं मुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषवलं आहे. अशी माहिती राजभवनाच्या वेबसाईटवरच देण्यात आली आहे.
 
त्यामुळे कोश्यारी यांची भूमिका पक्षपातीपणाची आहे, हे एकूणच घडामोडींवरून दिसतं आहे, असं मराठी एकीकरण समितीने म्हटलं आहे.
 
पहाटे राष्ट्रपती राजवट हटवणं, सकाळीच शपथविधी सोहळा आयोजित करणं हे प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारे आहेत. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांनी कोणाचेही हितसंबंध जपणे योग्य नाही. मणिपूर, मेघालय, गोवा आणि कर्नाटक राज्यात देखील राज्यपालांच्या भूमिकेमुळे काय घडले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ हटवण्यात यावे, असं समितीने म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments