Publish Date: Fri, 27 Dec 2019 (08:50 IST)
Updated Date: Fri, 27 Dec 2019 (08:51 IST)
कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये सूर्यग्रहणादरम्यान विकलांग मुलांना जमिनीत पुरुन ठेवण्यात आहे.
कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील ताज सुलतानपूर गावात ग्रहणाच्या दिवशी पोलिओग्रस्त, विकलांग, मतिमंद आणि आजारी मुलांना गळ्यापर्यंत मातीत गाडल्यास मुलं बरी होतात, अशी अंधश्रद्धा असल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
यादरम्यान, मुलांना तहान लागल्यास पालक आणि अन्य मंडळी पाणी पाजत असलेले पाहायला मिळाले. ग्रहण लागल्यापासून ते संपेपर्यंत हा प्रकार सुरू असल्याचं बातमीत म्हटलं आहे.