Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाबमध्ये आंदोलक शेतकऱ्यांकडून 1300 जिओ मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित

Webdunia
मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (15:53 IST)
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या काही गटांनी पंजाबमध्ये रिलायन्स जिओ मोबाईल टॉवरवर हल्ला केला आहे. 
 
राज्यात अनेक ठिकाणी यामुळे जिओ ग्राहकांना रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबमधील या गटांनी 1,300 मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
 
पंजाबमध्ये जिओचे 9 मोबाईल टॉवर्स असून यापैकी अनेक टॉवर्सला वीजपुरवठा करणाऱ्या वायर्स आंदोलकांनी कापल्या आहेत.
 
दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आंदोलक शेतकऱ्यांनी अदानी आणि अंबानीसारख्या बड्या उद्योजकांनाही विरोध केला आहे.
 
हिंसक कृत्य केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments