Publish Date: Mon, 13 May 2019 (10:22 IST)
Updated Date: Mon, 13 May 2019 (10:23 IST)
"नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटविण्यात येईल," असं आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी दिलं. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
"जम्मू आणि काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा, अशी मागणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केली आहे. तर काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात 'AFSPA' कायद्याचा फेरआढावा घेऊन देशद्रोहाच्या तरतुदीत दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं आहे.
"मात्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास कलम 370 निश्चितपणे हटविण्यात येईल," असं शहा पुढे म्हणाले.
webdunia
Publish Date: Mon, 13 May 2019 (10:22 IST)
Updated Date: Mon, 13 May 2019 (10:23 IST)