Publish Date: Sat, 05 Oct 2019 (14:24 IST)
Updated Date: Sat, 05 Oct 2019 (14:29 IST)
त्रिपुरा राज्यातील मंदिरात पशु-पक्ष्यांचे बळी देण्यावर त्रिपुरा उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
पशु-पक्ष्यांचा बळी देणं हा धार्मिक अधिकाराचा मूलभूत भाग होऊ शकत नाही, शिवाय त्यामुळे राज्य घटनेच्या कलम 21चं उल्लंघन होत आहे, कारण प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले.
या निकालामुळे गेल्या 525 वर्षांत यावर्षी प्रथमच येथील प्रसिद्ध दुर्गाबारी मंदिरात पशु-पक्ष्यांचा बळी दिला जाणार नाही.
दुर्गाबारी मंदिराचे धर्मगुरू दुलाल भट्टाचार्य यांनी सांगितले, की गेल्या 525 वर्षांत प्रथमच या वेळी पाच दिवसांच्या दुर्गा पूजा उत्सवात प्राण्यांचा बळी दिला जाणार नाही. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल व न्या. अरिंधम लोध यांनी सांगितले, की सरकार असो किंवा व्यक्ती, कुणालाही यापुढे मंदिरात पशुबळी देता येणार नाही. निवृत्त न्यायिक अधिकारी सुभाष भट्टाचार्य यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती.