Festival Posters

अक्षयचा आगामी चित्रपट शेतकर्‍यांवर आधारित

Webdunia
सोमवार, 7 मे 2018 (13:57 IST)
अभिनेता अक्षयकुार आता देशातील शेतकर्‍यांवर चित्रपट काढणार आहे. देशात होणार्‍या शेतकरी आत्महत्या, त्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्र्न यावर दिशा दाखवणारा अक्षयचा आगामी चित्रपट असणार आहे. यातून एक सामाजिक संदेश देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नावही त्याने जाहीर केले. नुकत्याच झालेल्या न्यू इंडिया कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात अक्षयकुमारने हजेरी लावली होती. आपला आगामी चित्रपट शेतकरी आणि गावावर आधारित असेल, असे यावेळी त्याने सांगितले.
 
हुंडा या विषयाशी संबंधित ठोस काही हाती आल्यास ह्या विषयावरही चित्रपट करायला आवडेल, असे काही दिवसांपूर्वीच अक्षय म्हणाला होता. देशातील छोटी-छोटी गावे आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करुन देतात. गाव हे आपल्या वडिलांसारखे असते आणि शहर हे तरुण मुलांसारखे. आपल्या वडिलांची काळजी घेणे आणि त्यांची सेवा करणे हे तरुण मुलाचे कर्तव्य आहे. तसेच हुशार माणसे नेहमी शहरातच असतात असे नसते. गावातसुद्धा अनेक हुशार माणसे आहेत, असे अक्षयने सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

गजनी'चे निर्माते मधू मंटेना व पत्नी इरा मंटेना यांना पुत्ररत्न प्राप्त झाले

Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा

'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद

पुढील लेख
Show comments