Festival Posters

काजोल-अजय येणार परत रुपेरी पडद्यावर?

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:40 IST)
बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अजय देवगण आणि काजोल यांची जोडी पुन्हा एकदा मोठया पडद्यावर आणणार असल्याचे सांगितले आहे. अनीज बज्मी यांनी अजय-काजोल यांच्यासोबत “प्यार तो होना ही था’मध्ये एकत्रितपणे काम केले होते. त्यावेळी दोन्ही कलाकारांसोबत काम करण्याचा चांगला अनुभव होता, असे सांगत बज्मी म्हणाले एका चांगल्या स्क्रिप्टमधून या जोडीला पुन्हा एकत्रित आणणार आहे.
 
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले अनीस बज्मी सध्या त्यांच्या आगामी “पागलपंती’चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, इलियाना डिक्रूज, अरशद वारसी, पुलकित सम्राट, कृति खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्‍ला काम करित आहेत.
 
दरम्यान, अजय देवगण आणि काजोल यांच्या नवीन प्रॉजेक्‍टबाबत सांगायचे झाल्यास हे दोघेजण पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणा-या “तानाजी द अनसंग वॉरियर’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि भूषण कुमार करत आहे. अजय आणि काजोल यांनी 1999मध्ये लग्न केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

"मराठी येत नसेल तर परवाना रद्द होईल," अभिनेता रितेश देशमुखने प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला

मे महिन्यात गोवा ट्रिप फायदेशीर का नाही?

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता जय सोमनाथ'साठी एकत्र आले

लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली

रणवीर सिंगच्या शाही शैलीच्या 'धुरंधर'ने नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments