Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी लोकांना घाटी संबोधले जायचे

Webdunia
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (11:27 IST)
एक अभिनेत्री असल्याचा, मराठी असल्याचा मी त्रास सहन केला आहे, मी अनेक गोष्टी भोग्ल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझबद्दल बोलले नाही. मात्र आता मी या सगळ्या गोष्टी बोलते आहे. त्यावेळी मराठी लोकांना चित्रपटसृष्टीत घाटी असेही संबोधले जात होते, अशी खंत अभिनेत्री ऊर्मिला मांतोंडकर यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्य इतकीच लख्ख आहे, असे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी म्हटले. 
 
कंगना राणावतने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात आवाज उठवला त्याबद्दल काय मत आहे, असा प्रश्न ऊर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना घराणेशाही असल्याचे नमूद केले. 90 च्या दशकात 15 ते 16 अभिनेत्री माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या 11 ते 12 नट्या या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटिझम हे आज आलेले नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे असेही त्या म्हणाल्या .
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

नवीन

१५ ऑगस्ट रोजी पाहण्यासारखे ८ सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर चित्रपट

Independence Day 2026 या सेलिब्रिटींनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ उलगडला, काहींनी भगतसिंग यांची निवड केली, तर काहींनी राणी लक्ष्मीबाई यांची

स्वातंत्र्यदिनानिमित्त वीकेंडला फिरण्यासाठी देशभक्तीचा अनुभव देणारी निसर्गरम्य ठिकाणे

राजकुमार रावच्या 'प्रहार'ला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली

ट्रोब विद्यापीठाने राणी मुखर्जी यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली

पुढील लेख
Show comments