Festival Posters

राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:50 IST)
राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,८४,७६८ झाली आहे. राज्यात ५२,१५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,३३६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ८, ठाणे ४, नाशिक ६, पुणे ३, सोलापूर ३, नागपूर ४ व अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू नाशिक ६, ठाणे ४, कोल्हापूर २,नागपूर १, सिंधुदुर्ग १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.
 
तर ३,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८,८१,०८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,८४,५८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८४,७६८ (१४.५० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,८५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

आंदोलना दरम्यान अभिजीत दीपके यांनी अचानक उपोषण सोडले

LIVE: ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर संजय देशमुख यांचा खुलासा

जुना फोन विकण्यापूर्वी या ५ सेटिंग्स नक्की बंद करा

६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर संजय देशमुख यांचा खुलासा

मुंबईत बेस्ट बस डिव्हायडरला धडकल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, बस चालक आणि वाहक जखमी

पुढील लेख
Show comments