Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात बुधवारी ३,९१३ नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (10:00 IST)
राज्यात बुधवारी ३,९१३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०६,३७१ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ५४,५७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४८,९६९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
 
राज्यात बुधवारी ९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १४, ठाणे ४, रायगड ६, नाशिक ९, अहमदनगर ५, पुणे ९, सोलापूर ८, औरंगाबाद १३, चंद्रपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ९३ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू औरंगाबाद ११, नाशिक ७, रायगड ४, पुणे २, सोलापूर १, ठाणे १, पालघर १, यवतमाळ १, नागपूर १, जालना १, जळगाव १ आणि अमरावती १ असे आहेत.
 
बुधवारी ७,६२० रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,०१,७०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५१ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,२२,७८,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०६,३७१ (१५.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८८,७२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments