Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गुरुवारी ४ हजार ३४२ नवीन करोनाबाधित

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (08:50 IST)
राज्यात गुरुवारी ४ हजार ३४२ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ७५५ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.याशिवाय, ५५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अजुनही पूर्णपणे ओसरलेली नाही, अद्यापही रोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येत भर पडतच आहे.तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येताना दिसत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत, मात्र जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत व करोनाबाधितांची संख्येत वाढ सुरू झाली तर, पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा इशारा देखील दिला गेला आहे.
 
राज्यात आजपर्यंत ६२, ८१, ९८५ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतली आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के झाला आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,७३,६७४ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७५५१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.तर, राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के आहे.राज्यात आजपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या ५,४३,२७,४६९ नमुन्यांपैकी ६४,७३,६७४ नमूने पॉझिटिव्ह (११.९२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८७,३८५ जण गृहविलगीकरणात आहेत आणि १ हजार ९७१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. याशिवाय, राज्यात आज रोजी ५०,६०७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments