Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

`डेल्टा'चा राज्यातला पहिला मृत्यू

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (22:43 IST)
महाराष्ट्रात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या मुंबईत पहिल्या बळीची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल समोर आल्यावर महाराष्ट्र सरकारने अनलॉकच्या नियमात बदल केले आहेत. दरम्यान, मुंबईत 11 डेल्टा प्लसचे (delta plus patient) रूग्ण होते. त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
या आधीच्या नियमावलीनुसार संक्रमणाच्या आणि ऑक्सीजन बेड उपलब्धतेच्या आधारावर जिल्ह्यांची पाच स्तरात विभागणी करण्यात आली होती. यानुसार पहिल्या दोन स्तरात मोडणार्याच जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये मोठी सुट देण्यात आली. मात्र आता पहिला आणि दुसरा स्तर काढून टाकण्यात आला असून सर्व जिल्हे व महानगरपालिका क्षेत्रात तिसर्या  स्तराप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या स्वॅबचे नमुने जिनोम तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल समोर आला असून या महिलेला डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे महाराष्ट्रातील गेलेला पहिला बळी, अशी या महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातही डेल्टा प्लसची लागण झालेल्या एका रुग्णाचा बळी गेला होता. संगमेश्वरमधील डेल्टा प्लसमुळे बळी गेलेल्या महिलेला इतरही आजार होते, असे सांगितले जात आहे. मात्र यामुळे चिंता नक्कीच वाढल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments