Dharma Sangrah

आशिया चषकही रद्द होणार : टीम इंडियाला मोठा धक्का बसणार

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:56 IST)
कोरोनामुळे क्रिकेट क्षेत्रातील आणखी एक मोठी स्पर्धा (आशिया चषक) रद्द होण्याची शक्यता असून हा टीम इंडिाला मोठाधक्का मानला जात आहे.
 
कोरोनामुळे जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द अथवा स्थगित केल्या आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, आफ्रिका आदी सर्व देशांतील द्विपक्षीय मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग असलेली आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत अन्य देशातील खेळाडू खेळत असल्यामुळे त्याचा फटका त्यांनाही बसेल. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल हे माहीत नाही. 
 
येत्या काही महिन्यात होणारी आशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट काउंसिलची या स्पर्धा संदर्भातील बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. एसीसीकडून आशिया कपचे आयोजन केले जाते. नियोजित वेळेनुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार होती. पण सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा होईल असे वाटत नाही.
 
पुढील आशिया कप स्पर्धा कधी आणि कुठे घेण्यासंदर्भात एसीसीची बैठक हणोर होती, पण ही बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या वर्षी आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण बीसीसीआयने भारतीयक्रिकेटपटू कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात खेळणार नाहीत अशी भूमिका घेतली होती.
 
भारताच्या या भूमिकावर पीसीबी आणि एसीसीला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एसीसीकडे दोनच पर्याय शिल्लक राहतात एक म्हणजे भारताशिवाय ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये घ्यायची किंवा भारतासह स्पर्धेचे ठिकाण बदलून दुबईत त्याचे आयोजन करायचे. या संदर्भातच एसीसीची बैठक 29 मार्च रोजी होणार होती. पण ही बैठक कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. या बैठकीच्या आधी सौरव गांगुली यांनी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळू शकतो. पण स्पर्धा अन्य  ठिकाणी झाली पाहिजे. पाकिस्तानसाठी ही बाब मोठा झटका देणारी आहे. पाक बोर्डाला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करायचे असल्याने त्यांना आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये व्हावी अशी इच्छा आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील पाच पर्यटक बुडाले

परभणी येथील हनुमान मंदिरात मंडपाचे छत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

रिलायन्सची सूत्रे कोण स्वीकारणार, याचे उत्तर मुकेश अंबानी यांनी AGM मध्ये दिले

भिवंडीतील विषारी शोरमा विकणारे दुकान बुलडोझरने पाडले, २४ तासांत १०७ जण रुग्णालयात दाखल

नीट यूजी पुनर्परीक्षासाठी रेल्वेचा विशेष उपक्रम; नांदेड विभागाकडून या ६ पॅसेंजर गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार

पुढील लेख
Show comments