Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बजाज कंपनीत ७९ कर्मचाऱ्यांना कोरोना

Webdunia
शुक्रवार, 26 जून 2020 (16:12 IST)
औरंगाबाद येथील वाळूंज एमआयडीसीत बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील कंपनी अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवारी कंपनी बंद ठेवण्यास सांगितले आहे.
 
औरंगाबादमध्ये २५ जूनला एका दिवसात २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १२४ आणि ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२६६ कोरोनाबाधित रुग्ण असून २२१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये ७७ महिला आणि १५३ पुरूषांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments