Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ३६ डॉक्टरांचा मृत्यू, 'आयएमए’ने दिली माहिती

Webdunia
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (10:01 IST)
कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील ३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला. ३३ टक्के डॉक्टर मुंबईतील आहेत. ‘आयएमए’च्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक म्हणजे १२ डॉक्टरांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. या खालोखाल ठाणे, भिवंडी, कल्याण या भागांत आठ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद आहे. मृतांमध्ये ३३ टक्के डॉक्टर ६० वर्षांवरील, तर ५२ टक्के ५० ते ६० वयोगटांतील आहेत. ४० वर्षांखालील चार डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
दुसरीकडे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नोंद सरकारने ठेवलेली नाही असा खेद व्यक्त करत डॉक्टरांच्या मृत्यूची आकडेवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीर केली आहे.या डॉक्टरांना शहिदाचा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी ‘आयएमए’ने केली आहे.
 
देशभरात कोरोनाने बळी घेतलेल्या डॉक्टरांची संख्या ३८२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक डॉक्टरांच्या मृत्यूची (६३) नोंद तमिळनाडूत झाली आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश (४२), उत्तर प्रदेश (४२) आणि गुजरात (३९) अशी संख्या आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, दहशतवाद संपवण्याची चर्चा... सर्व राजकीय पक्ष एकत्र आले

LIVE: महाराष्ट्रात तीव्र उष्णतेमुळे शाळा-कॉलेजच्या वेळा बदलणार

दहशतवादी तहव्वुर राणाला मोठा धक्का, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व २६ जणांना नुकसानभरपाई मिळेल-मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

तेलंगणात १४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले

पुढील लेख