Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात तसेच राज्यात 31 मे पर्यंत संचारबंदी कायम

Webdunia
सोमवार, 18 मे 2020 (06:37 IST)
देशभात लॉकडाऊनमध्ये ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज संपणारा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. साथ रोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत. यामुळे राज्यात उद्यापासून टाळेबंदीचा चौथा टप्पा सुरू होईल. सध्यातरी लॉकडाऊन ३ मध्ये दिलेली शिथिलता कायम राहणार आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ५ तर अन्य दुकानं सकाळी १० ते संध्याकाळी ५ या यावेळेत सुरु राहतील. चंद्रपूर शहरात १३ मे रोजी एका महिलेला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं होतं. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात असूनही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. 
 
नांदेड जिल्ह्यातली प्रतिबंधित क्षेत्र वगळता उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक, तसंच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कार्यालयं काही अटींवर उद्यापासून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.   
 
यानुसार उपनिबंधक कार्यालयात पाच कर्मचारी, तर प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परीवहन अधिकाऱ्यांचं कार्यालय 10 टक्के कर्मचाऱ्यांसह चालू राहील. कार्यालयात मास्क, सॅनिटायझरचा वापर तसंच सुरक्षित सामाजिक अंतर राखणं आवश्यक राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

कोविड-19 साथीच्या आजारापासून पालकांनी तीन मुलांना बंदिवान ठेवले, राक्षस आणि बाहुल्यांच्या रेखाचित्रांनी बेड भरले होते

नागपुरात जागतिक दर्जाचे थिएटर बांधले जाण्याची चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांनी केली घोषणा

LIVE: सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गुगल, अॅपलसह 7 कंपन्यांनी आयआयसीटीसोबत करार केला,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले

सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments