Dharma Sangrah

आजपासून रेड, कंटेनमेंट वगळता ‘या’ जिल्ह्यात धावणार लालपरी

Webdunia
शुक्रवार, 22 मे 2020 (07:06 IST)
चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाला असून राज्य सरकारने यासाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार रेड आणि कंटेनमेंट क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात आजपासून अर्थात २२ मे पासून जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड अनिल परब यांनी दिली आहे.
 
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी करत केवळ रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर जिल्ह्यांना सशर्त एसटी महामंडळाला केवळ जिल्हा अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा  सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतील निवडक मार्गांवर शुक्रवारपासून एसटी बससेवा सुरू होणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी काही नियम देखील जारी करण्यात आले आहेत.
   
असे आहेत नियम 
जिल्हाअंतर्गत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू राहील.
प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) 
प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: अश्विनी भिडे बीएमसीच्या पहिल्या महिला आयुक्त बनल्या

लवकरच करार न झाल्यास, आम्ही खर्ग बेट उद्ध्वस्त करू,' राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

शीतल देवी यांना 'पॅरा तिरंदाज ऑफ द इयर' म्हणून गौरविण्यात आले

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

पुढील लेख
Show comments