Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, 'या' शहरात तब्बल सहा लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज

Webdunia
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (15:22 IST)
हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र (CCMB) या संस्थेने कोरोनाचा फैलाव जाणून घेण्यासाठी शहरातील सांडपाण्याची चाचणी केली आहे. मागच्या ३५ दिवसांपासून सांडपाण्याचे नमुने तपासले जात आहेत, या चाचणीतून तब्बल सहा लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. ही संख्या तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा सहापटीने अधिक आहे.
 
CSIR-CCMB आणि CSIR-IICT या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात मलनिस्सारण वाहिन्यातील नमुने गोळा केले होते. कोरोनाबाधित व्यक्तीच्या विष्ठेत कोरोनाच्या विषाणूचे अंश असतात. याच आधारावर हैदराबाद येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या ८० टक्के प्लँटमधून नमुने गोळा करण्यात आले. या सर्वेक्षणात जवळपास २ लाख लोकांच्या विष्ठेत कोरोना विषाणूचे कण दिसून आले आहेत. मानवी विष्ठेत ३५ दिवसांपर्यंत कोरोना विषाणूचे कण आढळून येतात. धक्कादायक बाब म्हणजे संपुर्ण तेलंगणा राज्याची कोरोनाबाधितांची संख्या ही एक लाखाच्या घरात असताना राजधानी हैदराबादमधील हे सर्वेक्षण खळबळजनक असे आहे.
 
तेलंगणा राज्यात ९७,४२४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१,५०९ रुग्णांवर उपचार सुरु असून ७५,१८६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाचे आरोग्य मंत्री इटेला राजेंद्र यांनी या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सध्या राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयात खाटा रिकाम्या आहेत. याचा अर्थ कोरोना आता कमी होत आहे. CCMB आणि ICMR ने सर्वेक्षण केले आहे, मात्र ते आकलनाच्या पलीकडचे आहे. कारण मला तरी कोरोनाचे संक्रमण आणि मृत्यूदर कमी होताना दिसतोय.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख