Marathi Biodata Maker

फळाच्या राजावर कोरोनामुळे संक्रांत

Webdunia
गुरूवार, 2 एप्रिल 2020 (11:01 IST)
फळांचा राजा म्हणून ओळखणार्‍या आंबवर यंदा कोरोनाने संक्रांत आणली आहे. दरवर्षी गुढीपाडव्यानंतर बाजारात दिसणारा हा ‘राजा' (आंबा) कोरोनामुळे दिसेनासा झाला आहे. उत्पादक ते ग्राहक ही साखळी तुटल्याने आंबा उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार सतिीच आवारात दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत होती; परंतु यंदा आंबा बाजारात दाखल होण्यापूर्वीच कोरोना व्हारसची चर्चा सुरू झाली. त्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली. संचारबंदी जाहीर करताना अत्यावश्यक सेवेअंतर्गत फळे व भाजीपालला नागरिकांना बाजारात जाऊन खरेदी, विक्री करण्याची सूट देण्यात आली; परंतु आंबा उत्पादक शेतकर्‍यांपासून ग्राहकांपर्यंत माल पोहोच होण्यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्याला मोठी  मागणी असते. हा हापूस आंबा कोकणातून मुंबई बाजारपेठात दाखल होतो. त्यानंतर देशभरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतो. त्यामध्ये केसर, देवगड, तोतापुरी जातीच्या आंब्यांना मागणी असते. कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून हा आंबा बाजारात येतो.
कोरोनामुळे जागोजागी होणारी नाकाबंदी, मजुरांची टंचाई, पॅकिंग साहित्याची कमतरता आणि मुळात मागणीच कमी असल्याने आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोलापूर बाजार समितीत केवळ आठ ते दहा  बॉक्स आंबा दाखल होत असल्याचे येथील व्यापारी मर्चंट यांनी सांगितल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

भारतीय रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये बदल केला, आता परतावा वेळेवर आधारित असेल

ठाणे परिवहन विभागाने ७९१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण कायदा लागू होऊ शकतो, सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे

राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य: युद्धामुळे ऊर्जा संकट अधिक गडद, ​​भारतासमोर 'मोठी परीक्षा'

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

पुढील लेख
Show comments