Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या 22 मार्च रोजी देशात ‘जनता कर्फ्यू’ ची घोषणा

Webdunia
गुरूवार, 19 मार्च 2020 (21:04 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्या परिस्थितीवर सुरक्षेसाठी देशवासीयांकडे जनता कर्फ्यूची मागणी केली आहे. 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 
 
जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध, त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. 
 
22 मार्च रोजी देशातील 130 कोटी भारतीयांना आपल्या घरात राहावे अशी मागणी मोदींनी देशवाश्यांकडे केली आहे. 
 
अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही तरी भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे आणि निर्देशांचं पालन करावं, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
 
करोना महायुद्धाच्या वेळेत असलेल्या काळाहूनही कठिण काळ असल्याचं मोदी म्हणाले. जागतिक महामारी असलेल्या करोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तसेच मोदींनी अशा परिस्थितीत ही लोकांच्या मदतीसाठी धावणार्‍यांचे आभार देखील मानले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments