Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाऊनमध्ये लग्नात न येण्यासाठी निमंत्रण : फेसबुकवर पार पडला जवानाचा विवाह सोहळा

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (18:55 IST)
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यात या परिस्थितीतही एक लग्न पार पडलं. हा विवाहसोहळा पार पाडत असताना सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली होती. या लग्नात तब्बल 270 हून अधिक नातेवाईक ऑनलाईन सहभागी झाले होते. याकरिता त्यांनी लग्नाला न येण्याचे निमंत्रण देखील दिले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी या गावातील अविनाश दोरुगडे आणि चंदगड तालुक्यातील कुदनुर गावातील रूपाली निर्मळकर या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. फक्त पुजारी आणि वधू वर हे तिघेजण याच या लग्नाला उपस्थित होते तेही मास्क बांधून. या तिघांनीही सोशल डिस्टन्स ठेवूनच हा विवाहसोहळा पार पाडला.

महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन फेसबुक अकाउंटवरून 270 व्हराडी या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी ऑनलाईन अक्षता टाकत वधू-वराला शुभेच्छा दिल्या. या जोडप्यांनी लग्नामध्ये जमलेला अहेर मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments