Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्युची नोंद

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:27 IST)
राज्यासह मुंबईत आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय असे चित्र समोर येत असलेल्या  आकडेवारीतून दिसून येत आहे. त्या  मुंबईकरांना तर मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात नवीन वर्षात  फेब्रुवारी महिन्यात आतापर्यत चौथ्यांदा शून्य मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूदर घटत चालला आहे. हा महापालिकेसह मुंबईकरांना दिलासा आहे.
 
मुंबईत तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती.त्यानंतर 16 आणि 17 फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्युची नोंद झालेली आहे.  20 फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली असल्याने फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा ही नोंद झालेली आहे. शून्य मृत्यूची नोंद या महिन्यात आणखीन\ होण्याची शक्यता आहे.
 
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड’चा पहिला रुग्ण हा ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ ला पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. या नंतर ‘डिसेंबर २०२१’ मध्ये देखील ७ वेळा ‘शून्य’ मृत्यूंची नोंद झाली होती. आता फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 4 वेळा शून्य मृत्युची नोंद झालेली आहे.
 
मुंबईत 169 नवे रूग्ण
मुंबईत रविवारी  169 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर आज 286 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यत 10 लाख 34 हजार 493 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 1 हजार 151 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख