Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदी- कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता देशात लॉकडाऊनची गरज नाही

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (11:15 IST)
कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
 
अर्थात, अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन कोरोनाला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला.
 
कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे.
 
"होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं," असं पंतप्रधानांनी म्हटलं.
 
ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
पंतप्रधान मोदींनी दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
 
19 राज्यांमध्ये 10 हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली होती.
 
भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 2,47,417 नव्या केसेस समोर आल्या आहेत. गेल्या एका दिवसाच्या तुलनेत ही 27 टक्क्यांची वाढ आहे. एका दिवसात देशात कोरोनामुळे 380 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या 24 तासात 84,825 जण या आजारातून बरे देखील झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडले जातील

बीड : दोरीने बांधले, केळी-टरबूजाची साले खायला देऊन जन्मदात्या वडिलांनीच क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या

काका आणि पुतण्या यांच्यात जवळीक वाढली का? शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा

नागपूर : तलावात गटाराचे पाणी, मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडणार, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला कोट्यवधींचा दंड

पुढील लेख
Show comments