Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात उच्चांकी कोरोना रूग्णांची वाढ, ४ दिवसांपासून सतत मोठी वाढ

Webdunia
सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (08:41 IST)
दिवसभरात राज्यात रविवारी उच्चांकी 23 हजार 350 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 328 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 
 
रविवारी एका दिवसात राज्यात 7,826 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 44 हजार 440 इतकी झाली आहे. राज्यातला रिकव्हरी रेट 71.03 टक्के आहे.
 
राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 7 हजार 212 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2 लाख 35 हजार 857 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
 
राज्यात आतापर्यंत एकूण 26 हजार 604 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून सध्याचा राज्यातील मृत्यूदर 2.93 टक्के इतका आहे. 
 
राज्यात आतापर्यंत 46,47,742 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 9, 07, 212 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 14,96,72 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 38,509 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
 
दरम्यान, रविवारी सलग चौथ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 3 सप्टेंबरला राज्यात 18 हजार 105 कोरोनाबाधित आढळले होते. 4 सप्टेंबरला 19 हजार 218 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर 5 सप्टेंबर रोजी 20 हजार 489 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

नागपूरच्या शिवसेना नेत्याविरुद्ध हॉटेल मालकिणीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

कानपूरमध्ये सहा मजली इमारतीला आग,सहा जणांचा होरपळून मृत्यू

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

पुढील लेख
Show comments