Festival Posters

31 मार्च नव्हे, बंदचा निर्णय पुढील आदेशापर्यंत: अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 20 मार्च 2020 (18:46 IST)
करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पण हा निर्णय 31 मार्च नव्हे तर पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
पत्रकार परिषेदेत ते म्हणाले की लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. अगदीच शक्य नसेल तर मुलाकडचे आणि मुलीकडचे असे २५ लोक मिळून ते लग्न पार पाडा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की सर्वतोपरी काळजी घ्या आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. 
 
प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने इच्छाशक्ती दाखवून घरी राहिलं पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीही अफवा पसरवू नका असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
 
कंपन्यांना आर्थिक नुकसान झेलावं लागणार असून माणूस गमावण्यापेक्षा आर्थिक नुकसान परवडलं त्यामुळे कंपन्यांनी सहकार्य करावं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

७ सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? 'हिंदुस्तानी भाऊ'चा खळबळजनक दावा!

महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी मोठी घोषणा; मसुदा तयार करण्यासाठी ७ सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत!

LIVE: मुंबई में बनेगा दुनिया का सबसे बड़ा वॉटर मेट्रो नेटवर्क

OPPO Reno16 सिरीजची भारतात पहिली विक्री सुरू! जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

कलयुगी लेक! नोकरी आणि संपत्तीसाठी सख्ख्या आईची ७ लाखांची सुपारी देऊन हत्या

पुढील लेख
Show comments