Festival Posters

श्रीलंकेनंतर युएईने दिली ऑफर

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (10:44 IST)
मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. कोरोना व्हायरस नसता तर आयपीएलचा 13वा हंगाम आता पिकवर असता. कारण नियोजित वेळेनुसार आयपीएल 29 मार्चपासून सुरू होणार होती आणि 24 मे रोजी फायनल सामना होणार होता. असे झाले असते तर आता क्वालीफायर मॅच खेळण्यासाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकावे लागतील आदी चर्चा सुरू असत. पण करोनाने सर्व काही बिघड बीसीसीआयने ही स्पर्धा प्रथम 14 एप्रिलपर्यंत स्थगित केली होती. पण त्यानंतर कोरोना संकट वाढल्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.

जोपर्यंत सरकारकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत स्पर्धा होणार नाही, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. भविष्यात ही स्पर्धा होईल की नाही याबद्दल कोणी सांगण्यास तयार नाही. दरम्यान, आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने दाखवली होती. लंकने बीसीसीआयला तशी ऑफर दिली होती. अर्थात बीसीसीआयने या ऑफरमध्ये फारसा रस दाखवला नाही. आता लंकेनंतर आणखी एका देशाने आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.

युएईने बीसीसीआयला घेण्याची ऑफर दिली आहे. करोना संकटामुळे यावर्षी स्पर्धा परदेशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी देखील ही बाब मान्य केली आहे. अर्थात बीसीसीआयने श्रीलंका असो की युएई या दोन्ही देशांच्या ऑफरवर कोणताही विचार केला नाही. कारण कोणत्याही मोठ्या देशात अद्याप क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. अद्याप आंतरराष्ट्रीय विमान सेवाच सुरू झालेली नाही. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अरुण धूमल यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवेमुळे घबराट

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण; पीडितेचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना अटक

जालना प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय; दुचाकींना २०० रुपयांचे इंधन, तर चारचाकींना २००० रुपयांचे इंधन दिले जाणार

गॅसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना रॉकेल पुरवण्याचा निर्णय घेतला

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाच्या संकटामुळे भारतात महागाई वाढेल का?

पुढील लेख
Show comments