Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करा, आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

Webdunia
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (08:44 IST)
देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन जून-जुलै २०२० पासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांचे फक्त १० टक्केच मूल्यांकन होते. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याऐवजी त्यांना उतीर्ण करण्यात यावे असेही ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
 
राज्यातील सर्व नागरिक आपल्या नेतृत्वाखाली कोरोनाचा सामना करत आहे. भारताकडून कोरोनाला चांगला प्रतिकार करण्यात येत असून, नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या देशातील विद्यार्थ्यांच्या स्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो देशातील वाढत्या कोरोनामुळे अद्यापही अनेक नागरिक घरातूनच काम करत आहेत. अशातच देशातील अनेक विद्यापीठांकडून व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त असून, रेड झोनमध्ये अद्यापही वाहतुकीवर निर्बंध आहेत. अशामध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेणे शक्य नाही. जगातील अनेक देशांमध्ये शाळा व कॉलेज सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडील बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरात त्यांचे आजी आजोबा राहत असल्याने विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फारच घातक आहे. त्यामुळे फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी असे अनेकजणांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किंवा ऑनलाईन घेण्यात येणार्‍या देशातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

माझ्या विरोधात षडयंत्र रचले गेले, अरविंद केजरीवाल जनतेच्या अदालत मध्ये म्हणाले

मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, ओळखीच्या व्यक्तीवर खुनाचा संशय

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट,अनेकांचा मृत्यू

महिलेची हत्या, मृतदेहाचे 30 हून अधिक तुकडे फ्रिज मध्ये आढळले

पुढील लेख
Show comments