Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्यावर

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (09:38 IST)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्यावर पोहोचली आहे. राज्यात शुक्रवारी तब्बल २४ हजार ८८६ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे. 
 
राज्यात शुक्रवारी दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १४,८०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच,  राज्यात सध्या २ लाख ७१ हजार ५६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना मृत्यू दर हा २.८३ वर गेला आहे. दुसरीकडे १४ हजार ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १५ हजार ०२३ जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे झाले आहे.
 
सध्या राज्यातील मृत्यूदर २.८३ टक्के एवढा झाला आहे. तर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५० लाख ७२ हजार ५२१ नमुन्यांपैकी १० लाख १५ हजार ६८१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १६ लाख ४७ हजार ७४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३८ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments