Festival Posters

महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा धोका; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Webdunia
गुरूवार, 29 एप्रिल 2021 (15:38 IST)
संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार उडाला असताना महाराष्ट्रात मात्र अद्यापही भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन वाढविला असून 15 मेपर्यंत तो लागू राहणार आहे. तसेच लसीकरणासह विविध उपाययोजना सुरू असून आता 18 वर्षावरील सर्वांनाच लसीकरण याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतु लसीकरणाचा वेग मंदावला तर कोरोनाची तिसरीला येऊ शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
 
अपुऱ्या लस उपलब्धतेमुळे महाराष्ट्रात दि. 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लसी देणे सुरू करणार नसल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच महाराष्ट्राला लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या लस नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती कमी झाली आहे.  जेव्हा एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक लसीकरण करतात तेव्हाच कोविड -१९ योग्य प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकते.
 
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात नऊ कोटी लसींपैकी फक्त दिड कोटी लोकांना लस देण्यात आली आहे, ती खूपच कमी आहे. जर आपण लसीकरण गती वाढविले नाही, तर जेव्हा लोक नोकरी किंवा इतर कामांसाठी बाहेर पडतात, तेव्हा कोविड -१९ ची तिसरी लाट येऊ शकते.
डिसेंबरमधील कोरोना प्रभाव कमी झाल्यामुळे लोक बेफिकीर झाले आणि कोविड -१९ ची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली. आपण मोठ्या प्रमाणावर लस दिली नाही तर तिसर्‍या लाटेला आमंत्रण ठरणार आहे.
 
राज्यात एप्रिलमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 15 लाख 53 हजार 922 रुग्णांची नोंद झाली असून 11 हजार 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकारला 20 मेपूर्वी भारत बायोटेक किंवा सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळण्याची शक्यता नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

नवीन

जयशंकर ते निर्मला सीतारमण... मंत्र्यांची मुलं परदेशात, भारताच्या नशिबी पेपर लीक! सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचा संताप

पेरण्या खोळंबल्या की संकट वाढलं? महाराष्ट्रात कुठे पूर तर कुठे दुबार पेरणीचे सावट

LIVE: पुण्यात जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याप्रकरणी मोठी कारवाई: एसडीएम (SDM) आणि तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित

सुनेत्रा पवार यांची होणारी सून काश्मिरी पंडित! पार्थ पवार यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब; जाणून घ्या कोण आहेत कायनात धर

पुण्यात भूमी अभिलेख फेरफार प्रकरणी एसडीएम, तहसीलदार आणि इतर १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

पुढील लेख
Show comments