Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय म्हणता, नोव्हेंबरमध्ये करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठणार

Webdunia
सोमवार, 15 जून 2020 (09:33 IST)
येत्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो. भारतीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) एका अभ्यास गटाच्या माध्यमातून पाहणी केली, त्यातून ही गोष्ट समोर आली आहे.
 
देशातील करोनाचा ज्वर अजूनही कमी झालेला नाही. लॉकडाउनमुळे काही प्रमाणात करोनाच्या प्रसारावर परिणाम झाला होता. मात्र, लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून देशात दिवसाला सरासरी १०,००० जवळपास रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
 
 देशातील करोनाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरनं संशोधकांचा समावेश असलेला ऑपरेशन रिसर्च ग्रुप स्थापन केला होता. देशात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीला करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठू शकते. या काळात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो, असं या ग्रुपनं केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे. देशात लागू करण्यात आलेल्या आठ आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे उच्चांक गाठण्याचा कालावधी ३४ ते ७४ दिवस लांबला आहे. त्यामुळे संक्रमणाची संख्या ६९ ते ९७ टक्क्यांनी कमी करण्यास मदत झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास वेळ मिळाला आहे,”असं या अभ्यासात म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

राज्यातील गरिबांना मिळणार नवीन घरे, नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर, कोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

मुंबईत ५३ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली, बीएमसीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

LIVE: मुंबईत ५३ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली, बीएमसीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

कलियुगातील आईचे क्रूर कृत्य, प्रियकराकडून अडीच वर्षांच्या मुलीवर दुष्कर्म केल्यानंतर हत्या

महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, आता CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज उपलब्ध होणार

पुढील लेख
Show comments