suvichar

धोनी ते ग्लोव्हज वापरणार नाही

Webdunia
महेंद्र सिंग धोनीच्या बलिदान बॅज बद्दल बीसीसीआयनं त्याचा बचाव केला आणि आयसीसीकडे विनंती केली तरी आयसीसीनं ती विनंती फेटाळून लावली आहे. नियमानुसार आता धोनीला बलिदान बॅज चिन्ह असलेले ग्लोव्हज वापरता येणार नाही.
 
आसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज' ची अधिक चर्चा होत आहे. आयसीसी नियमानुसार आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कोणत्याही खेळाडूला राजकीय, धार्मिक किंवा जातीय संदेश देणारं कृत्य करण्याची मुभा नाही. त्याच नियमानुसार आयसीसीनं धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्हावर आक्षेप नोंदवला आहे. 
 
यावर वाद वाढत असलेला बघत आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पुढील लढतीत हे ग्लोव्हज वापरणार नसल्याचे धोनीने स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे आयसीसीच्या नियमावलीतील नियमांचा भंग होत असेल तर वर्ल्डकपमध्ये मी हे ग्लोव्हज वापरणार नाही, असे धोनीने सांगितले आहे.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयनंही एक पाऊल मागे घेताना आयसीसीचे आदेश पाळले जातील हे स्पष्ट केले.
 
नियम हे सांगत असले तरी धोनी चाहत्यांना हा निर्णय काही पटलेला नाही. धोनीचे फॅन्स काय तर माजी खेळाडू गौतम गंभीरनेही धोनीची बाजू घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 जूनला झालेल्या सामन्यात धोनीनं ते ग्लोव्हज घातले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

नवीन

IND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्धची आपली पहिली २+ सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली

भारत व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंडचे लक्ष्य अव्वल स्थान पटकावण्याचे असेल

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशला पराभूत करून मोठा उलटफेर घडवला

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारताचा सलग तिसरा पराभव

पुढील लेख
Show comments