Festival Posters

दिवाळीच्या दिवशी पोळीचा हा उपाय बदलून देईल तुमचे भाग्य

Webdunia
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (22:32 IST)
तुम्ही बर्‍याच वेळा आपल्या मोठ्यांकडून हे ऐकले असेल की घरातील पहिली पोळी नेहमी वेगळी काढून ठेवायला पाहिजे. कोणी याला गायीला खाऊ घालतात तर कोणी कुत्र्याला. शास्त्रानुसार घरातील पहिली पोळी नेहमी वेगळी काढून ठेवायला पाहिजे.  
 
वेगळी काढलेल्या पोळीचे चार समान तुकडे करून ऐक तुकडा गायीला तर दुसरा काळ्या कुत्र्याला खाऊ घालायला पाहिजे. उरलेल्या दोन तुकड्यांपैकी एक कावळ्यासाठी तर दुसरा घराजवळच्या चौरस्त्यावर ठेवायला पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल कर सांगायचे म्हणजे या चारी गोष्टींचा संबंध पितरांशी जोडण्यात आला आहे. असे केल्याने पितृगण प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत करतात.  
 
शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी, घरातील पहिली पोळी गायीला खाऊ घालायला पाहिजे. त्यानंतर घरातील बाकी सदस्यांसाठी पोळ्या बनवायला पाहिजे.  
 
हिंदू धर्मानुसार गायीला पूजनीय मानण्यात आले आहे. शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असतो. जेव्हा आम्ही दिवाळीच्या दिवशी पहिली पोळी गायीला खाऊ घालतो तेव्हा याचा अर्थ असा असतो की सर्व देवी देवतांना आम्ही पोळी खाऊ घातली आहे. असे केल्याने त्या व्यक्तीची सर्व इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख समृद्धी येते. म्हणून दिवाळीच्या दिवशी घरातील पहिली पोळी गायीला जरूर खाऊ घालायला पाहिजे.    
 
दिवाळी शिवाय देखील पहिली पोळी वेगळी काढून ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घरात सतत वाद विवाद होत असतील तर शनिवारी पहिली पोळी एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायला पाहिजे. असे केल्याने कुटुंबात होणारे मतभेद दूर होतील आणि घरात सुख शांती राहील.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

Vat Purnima 2026 वट पौर्णिमा २०२६: पूजा, शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि जाणून घ्या काय करावे-काय टाळावे

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

Muharram 2026: मोहरम का साजरा केला जातो? जाणून घ्या कर्बलाचा इतिहास आणि महत्त्व

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments