Dharma Sangrah

Solar Eclipse 2022 : केव्हा, कधी आणि कोणत्या राशीत होणार आहे 2022 चे पहिले सूर्यग्रहण

Webdunia
सोमवार, 17 जानेवारी 2022 (23:42 IST)
Solar Eclipse 2022 : जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची खगोलीय घटना म्हणून सूर्यग्रहणाकडे पाहिले जाते. असे मानले जाते की जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा त्याचा प्रभाव देश आणि जगावर दिसून येतो, तसेच त्याचा प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंत दिसून येतो.
 
सूर्यग्रहण २०२२ (Surya Grahan 2022) केव्हा आहे
ज्योतिष गणनेनुसार, पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी होईल. हे वर्षातील पहिले ग्रहण असेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे वृषभ राशीत होणारे आंशिक ग्रहण असेल. हे सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम-दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिक महासागर यांसारख्या भागातून दिसणार आहे. आंशिक असल्याने त्याचा भारतावर परिणाम होणार नाही. संपूर्ण ग्रहणाच्या बाबतीतच सुतक नियम पाळले जातात. पंचांगानुसार 2022 मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणांचा योगायोग आहे.
 
वर्षातील पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीत
वर्षातील पहिले सूर्यग्रहण शनिवार, 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. हे ग्रहण दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि 4:07 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण वृषभ राशीत होणार आहे.
घरात चांदीचा मोर ठेवा, नशीब उजळेल
सूर्यग्रहणादरम्यान 'सुतक'ची स्थिती
हे वर्षातील पूर्ण सूर्यग्रहण नसून हे आंशिक सूर्यग्रहण आहे. त्यामुळे सुतक नियम पाळण्याची गरज भासणार नाही. मान्यतेनुसार जेव्हा पूर्ण ग्रहणाची स्थिती निर्माण होते तेव्हाच सुतक प्रभावी किंवा वैध ठरते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

गंगा माता स्तोत्रम् | Ganga Mata Stotram गंगा मातेच्या कृपेचा अनुभव देणारे पवित्र स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments