Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विष्णू कृपेचा महिना म्हणजे अधिक मास

वेबदुनिया
पुरूषोत्तम मास अर्थात अधिक मास चार वर्षांत एकदा येतो. धार्मिक व पुण्य कार्ये करण्यासाठी हा महिना विशेष उपयुक्त आहे. अधिक पुण्य गाठीला बांधण्यासाठी या महिन्याचा उपयोग करून घ्यावा. 

श्राद्ध, स्नान व दान ही तीन कर्मे प्रामुख्याने या महिन्यात होतात. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासह अनेक पुण्यफल देणारा हा महिना आहे.

मुक्ती मिळविण्यासाठी मनुष्यजीव आयुष्यभर काही ना काही करत असतो. पण तरीही त्याला मुक्तीचा मार्ग काही मिळत नाही. तो मार्ग जाणून घेण्यासाठी अधिक मास उपयुक्त आहे. भगवान विष्णूंचे स्मरण केल्यास हा मुक्तीचा मार्ग सापडू शकतो. त्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे, गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करणे केव्हाही चांगले.

भागवत वाचणे हाही पुण्यफल मिळविण्याचा एक मार्ग आहे. कारण भागवताचे महात्म्य अपार आहे. त्यातही अधिक मासात ते वाचणे अधिक पुण्यदायी आहे. विष्णूनेच अधिक मास पुण्य कमाविण्यासाठीच तयार केला आहे. हिरण्यकश्यपूला बारा महिन्यात कधीच मरणार नाहीस असे वरदान मिळाले होते. त्यामुळे त्याला मारण्यासाठी हा अधिक मास विष्णूने निर्माण केला होता. नरसिंह अवतार घेऊन विष्णूने हिरण्यकश्यपूला संपवले होते. त्यामुळे सहाजिकच हा मास त्याच्या स्तवनाचा आहे.

विष्णूचा जप या महिन्यात करावा. या जपाने नक्कीच मुक्ती मिळू शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रावण महिन्यात शनिवारी 'पारंपरिक कढी-खिचडी' बनवण्याची सुंदर परंपरा

मंगळागौरच्या दिवशी चुकूनही करू नका या १० चुका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

Sampat Shanivar Katha संपत शनिवारची कहाणी

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि गाणी का खेळली जातात? जाणून घ्या यामागील आरोग्यदायी व शास्त्रीय कारणे!

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments