Festival Posters

चाणक्य नीती: या 3 गोष्टींसाठी संकोच बाळगू नका

Webdunia
गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (15:45 IST)
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात मानवी जीवनाशी संबंधित विविध पैलूंवर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. चाणक्य म्हणतात की मानवाला नेहमी संयम राखूनच काम करावे, पण त्यांनी नीतिशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांच्या मध्ये अजिबात संकोच बाळगू नये. चाणक्य म्हणतात की या कामात संकोच केला तर व्यक्तीला नुकसान होऊ शकते. पण या कामात संकोच न करणारे व्यक्ती यशस्वी होतात. चला तर मग जाणून घेऊ या अशा कोणत्या गोष्टी आहे ज्यांच्या साठी संकोच बाळगू नये.
 
1 पैशाच्या संबंधित प्रकरणांमध्ये अजिबात संकोच करू नये.
चाणक्य म्हणतात की मनुष्याला पैशाच्या बाबतीत अजिबात संकोच करू नये. जे लोक पैशाचा बाबतीत संकोच करतात त्यांना तोटा होण्याची शक्यता असते. एखाद्याला पैसे उसने दिले असतील तर त्याच्या कडून मागायला संकोच करू नये. तसेच जर आपण व्यवसाय करीत आहात तर त्यामध्ये देखील स्पष्ट राहा अन्यथा पैशाचा तोटा संभवतो.
 
2 गुरू कडून ज्ञान घेताना देखील संकोच करू नये -
चाणक्य नीती म्हणते की गुरू कडून शिक्षण घेताना कधीही लाज बाळगू नये. मनात एखादा प्रश्न पडल्यास किंवा कोणतेही  मंत्र किंवा गोष्ट समजत नसेल तर ते त्वरितच विचारावे. केवळ एक जिज्ञासू व्यक्तीच आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवून ज्ञान प्राप्त करत. जे लोक शिक्षण घेताना कोणतीही लाज बाळगतात त्यांना पूर्ण ज्ञान मिळत नाही ज्यामुळे त्या लोकांना आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्यांना सामोरी जावं लागत.
 
3 खाण्याच्या बाबतीत संकोच करू नये -
चाणक्य म्हणतात की माणसाने जास्त अन्न खाऊ नये.पण जेवताना कोणत्याही प्रकारचे संकोच करू नये.काही लोकांना इतरांच्या समोर जेवायला किंवा कोणाच्या घरी खायला संकोच होतो अशा परिस्थितीत ते उपाशी राहतात. शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, जी केवळ अन्नाद्वारे मिळते. उपाशी राहून मेंदूवर नियंत्रण ठेवले जात नाही, त्यामुळे आपण कोणतेही काम व्यवस्थितरीत्या करू शकत नाही. म्हणून जेवण करताना कोणत्याही प्रकारचा संकोच करू नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Guru Arjan Dev तप्त तव्यावर बसवून अंगावर जळती वाळू ओतली तरी ढळली नाही श्रद्धा

Jamai Sasthi 2026 Katha जमाई षष्ठी कथा; मांजरीचा शाप आणि सुनेला पश्चात्ताप

Shri Suktam Path देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर श्री सूक्तमचे पठण करा

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments