Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नकारात्मक शक्तींना पळवून लावणारी कालाष्टमी

Webdunia
सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (11:58 IST)
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते.  या दिवशी भगवान शंकराच्या रुद्ररुप भगवान कालभैरवाची पूजा केली जाते. भगवान भैरव, भगवान शिव यांचे अवतार आहे. कालाष्टमीला भैरवाष्टमी नावाने देखील ओळखलं जातं. या पवित्र दिवशी भगवान भैरवाची पूजा केल्याने मृत्युची भीती नाहीशी होते आणि पापांचा नाश होतो. भगवान भैरव सर्व प्रकाराच्या आजरांपासून मुक्ती देतात. या दिवशी व्रत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
कालाष्टमीला भैरवासह देवी दुर्गाची पूजा करावी. कालाष्टमीला काली देवीची पूजा करण्याची देखील पद्धत आहे. शक्ति पूजा केल्याने भगवान भैरवाची पूजा केल्याचं संपूर्ण फल प्राप्त होतं. या दिवशी विधीपूर्वक शिवाची पूजा करावी. भगवान शिव यांच्यासोबत देवी पार्वती आणि भगवान श्रीगणेशाची उपासना करावी. 
 
या प्रकारे करा पूजा
कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र घालावे.
पूजा स्थळी गंगेचे पाणी शिंपडावं आणि स्थान शुद्ध करावं.
नंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी.
फुले, नारळ, इमरती, पान इत्यादी अर्पण करावं.
भगवान कालभैरवासमोर धूप-दीव लावावी.
भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करावा.
आरती करावी.
भैरव चालीसा पाठ करावा.
 
या दिवशी कालभैरवाची खरी भक्तिभावाने उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला भोजन द्यावं. असे केल्याने बाबा प्रसन्न होतात. 
भगवान शिवाचे दोन रुप सांगितले गेले आहेत- बटुक ​भैरव आणि काल भैरव. बटुक भैरव सौम्य आहे तर काल भैरव रौद्र रूप. मासिक कालाष्टमीला रात्री पूजन करावं. रात्री चंद्राला अर्घ्य द्यावं. भगवान भैरवची उपासना केल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो. सर्व प्रकाराच्या दोषांपासून मुक्ती मिळते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments