Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कपाळावर तिलक धारण करण्यामागील कारण

Webdunia
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (11:49 IST)
हिन्दू परंपरेनुसार विभिन्न धार्मिक अनुष्ठान आणि पूजा-पाठ करताना कपाळावर टिळा करतात. कपळावर टिळा लावणे शुभ मानले गेले आहे. यासाठी चंदन, कुंकु किंवा शेंदूर वापरलं जातं. सवाष्ण महिलांसाठी कुंकु सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. परंतू या मागे सशक्त वैज्ञानिक कारण देखील आहे. 
 
वैज्ञानिक तर्कानुसार मानव शरीरात डोळ्यांच्या मध्यभागी कपाळावर एक नस असते. जेव्हा कपाळवर तिलक लावण्यात येतं तेव्हा त्या नसवर दबाव वाढतो ज्याने नस सक्रिय होते आणि त्याचा सकारात्मक प्रभाव चेहर्‍याच्या स्नायूंवर होतो तसेच रक्तसंचार देखील सुरळीत होतं ज्याने ऊर्जेचा संचार होतो आणि सौंदर्यात वाढ होते.
 
धार्मिक दृष्ट्या भृकुटीमध्यात अर्थात दोन्ही भुवयांच्या मधोमध आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करतो. म्हणून कपाळावर तिलक करणे म्हणजे देव पूजनासाखरे आहे.
 
तिलक धारण करताना मध्यमेचा उपयोग करावा, असे शास्त्र आहे. मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणारी स्पंदने हृदयापर्यंत जाऊन भिडतात. 
 
भृकुटीमध्यात निवास करणार्‍या परमेश्‍वरास तिलक लावतांना तृतीय नेत्रातून स्फुरणारी स्पंदने मध्यमेद्वारा हृदयात जाऊन भिडल्यामुळे दिवसभर मनात भक्‍तीभाव आणि शांती नांदते.
 
स्त्रियांनी स्वतःला कुंकू लावताना अनामिकेने, तर दुसर्‍या स्त्रीला किंवा पुरुषाला कुंकू लावतांना मध्यमेने लावावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ganesh Mantra: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी गणपतीचे हे मंत्र जप करा

Vallabhacharya Jayanti 2025 कोण होते श्री वल्लभाचार्य ज्यांना स्वयं श्रीनाथजींने दिले होते दर्शन

अक्षय्य तृतीयेला नवग्रहशांतीसाठी काय दान करावे ते जाणून घ्या

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

Mangalwar मंगळवारी ही 4 कामे केल्यास नाराज होतात हनुमान

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments