suvichar

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

वेबदुनिया धर्म टीम
गुरूवार, 21 मे 2026 (16:23 IST)
वातींचे प्रकार
नंदादीप वात :-  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी -- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते...ही रोज पूजेच्या वेळेस लावतात...
 
बेलवात :- या श्रावण महिनाभर लावतात -- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर...या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात...
 
शिवरात्रवात :- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात...
 
वैकुंठवात :- 350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात... एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात...
 
टिपूर :- तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात...
 
अधिक महिन्याची वात :- 33 पदरी 33 वाती,33 फुलवाती तुपात भिजवून लावतात...कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात...
 
कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत :- 3 पदरी 105 वाती लावतात... कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात...
 
काडवाती :- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून आमच्याकडे गणपतीला आरती करतात प्रत्येकाच्या हातात एक,एक...
 
श्रावण :- रोज महिनाभर 11 पदराच्या 11 वाती लावतात...
फुलवाती :- या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी...
अनंतवात :- यामधे एक वशाची एक वात,दोन वशाच्या दोन वाती, तीन वशाच्या तीन....असे 108 वशाच्या 108 वाती करतात व तुपात भिजवून श्रीकृष्णाला ओवाळतात. 
देहवात :- आपल्या डोक्यावर टाळुपासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंत ची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची 108 किंवा 365 पदरी वात करतात व ती तेलात भिजवून ज्याच्या मापाची केलीय त्या व्यक्तीने लावायची असते. 
ब्रम्हांडवात :- आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पुर्ण डोक्याला फेर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीची 250 पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाची आहे त्यांचे हातून तीळ तेलात भिजवून लावतात.
 
काकडा :- कपड्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकड आरतीला लावायच्या... 
 
रथसप्तमी :- ला 7 पदरी
कृष्णाला 8 पदरी
रामनवमीला 9 पदरी 
दशावतारीवात विष्णूला -- 10 पदरी
शंकराला 11 पदरी
सूर्याला 12 पदरी
वैकुंठ चतुर्दशी ला 14 पदरी
गणपतीला 21 पदरी
 
हे सगळे वर्षभर करायचे असेल नेम म्हणून तर त्या त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत व्रत करतात करणारे...जसे रथसप्तमी ते रथसप्तमी.... गोकुळष्टमी ते गोकुळाष्टमी...
 
वरील सगळ्या वाती वसा काढूनच करतात... आणि जितकी पदरी पाहिजे तितके पदर गुंडाळायचे....फक्त जोडवाती म्हणजे एकाला एक दोन वाती जोडायच्या म्हणजे एक पूर्ण झाली की न तोडता दुसरी करायची...3 पदरी असते ही वात... 3+3 पदर...
 बेलवाती पण एकाला एक जोडून 3 वाती... 4,4,3 पदरी...
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

यौवन आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 'रंभाव्रत', पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

बिल्वाष्टकम् Bilvaashtakam या मंत्रासह करा भगवान शिवाची बिल्वपत्र पूजा

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

Somvati Amavasya 2026 वर्षातील पहिली सोमवती अमावस्या: दुर्मिळ योगांचा संयोग

दर्श अमावस्या 2026 या दिवशी ही 5 कामे केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments