Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shattila Ekadashi 2023 :षट्तिला एकादशीला तीळ दानाचे महत्त्व आणि कथा

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (08:36 IST)
षट्तिला एकादशीला तिळ वापरून विष्णूंची पूजा अर्चना केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीला तीळ वापरून स्नान, नैवेद्य, दान, तरपण करण्याची परंपरा आहे. या दिवशी तिळाने प्रभू विष्णूंची पूजा करावी व पिवळे फळ, फुलं व वस्त्र अर्पित करावे. या दिवशी तीळ वापरल्याने पुण्य प्राप्ती होते आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होतात. या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं असे ही मानले गेले आहे.
 
तिळाच्या सहा प्रकारामुळे ही एकादशी षट्तिला एकादशी म्हणून ओळखली जाते.
1. तीळ स्नान, 2. तीळ उटणे, 3. तीळ हवन, 4. तीळ तरपण, 5. तीळ भोजन, 6. तीळ दान हे तिळाचे सहा प्रकार आहे. आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते.
 
तर जाणून घ्या या दिवशी काय करावे ते:
या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाचे उटणे लावा.
अंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळून स्नान करा.
हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.
पूर्व दिशेला तोंड करून पाच मूठ तिळांनी 108 वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राने आहुती द्या.
योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणाच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तिळाने तरपण करा.
या दिवशी अन्न सेवन करू नये. संध्याकाळी तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
तिळाचे पदार्थ गरजू व्यक्तीला दान करा.
 
काय करणे टाळावे
या दिवशी तामसिक भोजन करणे टाळावे.
एकादशी व्रत दरम्यान स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
पूजा आणि कथा दरम्यान कुटुंबातील वातावरण शांत असावे.
व्रत करणार्‍यांनी कमीत कमी भाषण करावे. खोटं मुळीच बोलू नये. निंदा करू नये.
मोठ्यांचा अपमान करू नये. 
काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इतर गोष्टींचा त्याग करून देवाच्या चरणी उपासना करावी.
 
कथा -
एकेकाळी दालभ्य ऋषींनी पुलस्त्य ऋषींना विचारले की - हे महाराज, पृथ्वी लोकात मनुष्य ब्रह्म हत्यादी महान पाप करतात, परकीय पैशांची चोरी व दुसर्‍यांची प्रगती बघून ईर्ष्या करतात. अनेक प्रकाराच्या व्यसनात अडकतात तरी त्यांना नर्क प्राप्ती होत नसते, यामागील कारण आहे तरी काय? ते असे कोणते दान-पुण्याचे कार्य करतात ज्याने त्यांचे सर्व पाप नाहीसे होतात, हे आपण मला सांगावे.
 
पुलस्त्य मुनी म्हणतात की - हे महाभाग! आपण मला अत्यंत गंभीर प्रश्न विचारला आहे. याने संसारातील प्राण्यांचं भलं होईल. हे गूढ ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि इंद्र इतरांना देखील माहित नाही परंतू मी आपल्याला या गुप्त तत्त्वांबद्दल निश्चित सांगेन.
 
त्यांनी म्हटले की पौष महिन्यात मनुष्याने स्वत:ला शुद्ध ठेवले पाहिजे. इंद्रियांवर ताबा ठेवून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या आणि द्वेष यांचा त्याग करावा आणि देवाचे स्मरण करावे.
 
पूजा विधी 
अंघोळ केल्यावर सर्व देवतांचे ध्यान करुन देवाची पूजा करावी आणि एकादशी व्रताचं संकल्प घ्यावं. रात्री जागरण करावे.
 
दुसर्‍या दिवशी धूप-दीप, नैवेद्य इतरांनी देवाची पूजा करुन खिचडीचा नैवदेय दाखवावा. नंतर पेठा, नारळ, सीताफळ किंवा सुपारीने अर्घ्य देऊन स्तुती करावी.
 
हे प्रभू! आपण गोर-गरीबांना शरण देणारे आहात, या संसारात रमलेल्या लोकांचा उद्धार करणारे आहात. हे पुंडरीकाक्ष! हे विश्वभावन! हे सुब्रह्मण्य! हे पूर्वज! हे जगत्पते! आपण देवी लक्ष्मीसह हे अर्घ्य स्वीकार करा.
 
नंतर पाण्याने भरलेलं कुंभ ब्राह्मणाला दान करावे आणि ब्राह्मणाला श्यामा गौ आणि तीळ पात्र देणे देखील उत्तम आहे. तीळ स्नान आणि भोजन दोन्हीं श्रेष्ठ ठरतं. या प्रकारे या एकादशी ‍तीळाचे दान केल्याने मनुष्य हजारो वर्ष स्वर्गात वास करतो. 

Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments