Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आहार ग्रहण करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर काय करावे जाणून घ्या

Webdunia
स्वयंपाक घरात भरभराटी राहावी, देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहावी आणि घरात कधीही धन-धान्याची कमी नसावी अशी इच्छा प्रत्येकाची असते यासाठी आहार ग्रहण करताना आपली वागणूक महत्त्वाची ठरते. अर्थातच आहार ग्रहण करण्यापूर्वी, आहार ग्रहण करताना आणि आहार ग्रहण केल्यानंतर काय करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर शास्त्रात जेवणाचे काही नियम सांगण्यात आले आहे त्या नियमांचे पालन केल्याने घरात बरकत येते.
 
आहार घेण्यापूर्वी काय करावे?
* 5 अंग (2 हात, 2 पाय, मुख) व्यवस्थित धुऊन भोजन ग्रहण करण्यासाठी बसावे.
* भोजन सुरू करण्यापूर्वी देवतांचे आव्हान अवश्य करावे.
* भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करून ग्रहण करावे.
* भोजनाची ताटली नेहमी पाट, चटई, चौक किंवा टेबलावर सन्मानाने ठेवावी.
* भोजनाचे मेल माहीत करूनच भोजन ग्रहण करावे.
 
भोजन करताना काय करावे?
* भोजन ग्रहण करताना वार्तालाप किंवा क्रोध करू नये.
* भोजन करताना विचित्र आवाज काढू नये.
* कुटुंबातील सदस्यांसोबत बसून भोजन करावे.
* पायात जोडे घालून भोजन करू नये.
* खरकटे हात किंवा पायाने अग्नीला स्पर्श करू नये.
* शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच जेवण ग्रहण करावे यानी राहू शांत होतो.
* जेवण्याचं ताट कधीही एकाने हाताने धरू नये. असे केल्याने भोजन प्रेत योनीत जातं.
 
भोजन केल्यानंतर काय करावे?
* भोजन केल्यानंतर ताटात हात धुऊ नये.
* ताटात खरकटं सोडू नये.
* रात्रीचं जेवण झाल्यावर खरकटी भांडी घरात ठेवू नये.
* जेवण झाल्यानंतर ताट कधीही किचन स्टँड, पलंग किंवा टेबलाखाली किंवा वर देखील ठेवू नये.
* रात्री तांदूळ, दही आणि सातूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून या वस्तूंचे सेवन टाळावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments