Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकादशीला विष्णुंना प्रसन्न करण्यासाठी काय करावे आणि काय नाही जाणून घ्या

Webdunia
एकादाशीला विधिपूर्वक भगवान श्री हरी विष्णूची पूजा आणि उपवास करतात. या व्रताने मनुष्याला भूत, प्रेत किंवा पिशाच योनीपासून मुक्ती मिळते, मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि श्रीहरींच्या कृपेने सर्व पापेही नष्ट होतात. तुम्हालाही एकादशीचे व्रत करायचे असेल तर काय करावे आणि काय करू नये या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
 
एकादशी काय करावे आणि करू नये
काय करू नये
 
1. एकादशीच्या दिवशी फुले, पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे. उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले, तुळशीची पाने इतर तयार करुन ठेवावी.
 
2. एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये.
 
3. एकादशीच्या व्रतामध्ये सलगम, पालक, तांदूळ, सुपारी, गाजर, वांगी, कोबी, जव इत्यादी खाऊ नयेत. यामुळे दोष निर्माण होतो.
 
4. एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न, लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये.
 
5. एकादशीचे व्रत करणार्‍या व्यक्तीने कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये. रागावणे टाळावे.
 
6. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडण करणे, नखे कापणे, केस कापणे, झाडू मारणे निषिद्ध आहे.
 
काय करावे
1. एकादशी व्रताच्या दिवशी शक्य असल्यास पिवळे कपडे घाला.
 
2. विष्णुपूजेच्या वेळी एकादशी व्रताची कथा ऐकणे आवश्यक आहे.
 
3. एकादशी व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर करावा.
 
4. या दिवशी कोणी तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते.
 
5. सूर्योदयानंतर एकादशीचे व्रत पारण करावे. मात्र द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारण करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments