Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
तुम्ही कदाचित असे बघितले असेल की लोक होलिका दहनच्या दुसर्या दिवशी त्या जागेवर जातात आणि तेथे राख उडवून धुलेंडी साजरी करतात. काही लोक ही राख आपल्या घरी देखील आणतात. पण या राखेच महत्त्व काय आहे आणि त्याला घरी का आणतात?
1- अशी मान्यता आहे की होळीची राख शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते. या राखेला कपाळावर लावल्याने भाग्योदय होतो आणि कुशाग्र बुद्धी होते.
2 - ह्या राखेत शरीरात स्थित दूषित द्रव्य शोषूण घेण्याची क्षमता असते, यामुळे ही भस्म लावल्याने कुठल्याही प्रकारचे चर्म रोग होत नाही.
3- असे देखील म्हटले जाते की होळीची उरलेली अग्नी आणि भस्मेला दुसर्या दिवशी घरात आणले तर अशुभ शक्तींपासून बचाव होतो.
4- बरेच लोक होळीची राख आणून त्याला ताबीक मध्ये बांधून ठेवतात. असे मानले जाते की यामुळे घरात वाईट आत्मेच प्रवेश होत नाही आणि घरात राहणार्या लोकांना कुठल्याही तंत्र मंत्राने नुकसान होत नाही.
भस्म लावताना मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते -
वंदितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शंकरेण च।
अतस्त्वं पाहि मां देवी! भूति भूतिप्रदा भव।।