Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑगस्ट क्रांती दिन 2023: 9 ऑगस्ट 1942 ऑगस्ट क्रांती दिना चा इतिहास जाणून घ्या

quit india movement
Webdunia
बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (07:41 IST)
9 ऑगस्ट क्रांती दिन 2023: 08 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू झाले. भारत छोडो आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही नाव देण्यात आले. भारत छोडो आंदोलन महात्मा गांधींनी सुरू केले होते. भारत छोडो आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक लोक तुरुंगात गेले. भारत छोडो आंदोलन ब्रिटिश राजवटीविरुद्ध अत्यंत प्रभावी ठरले आणि ब्रिटिश राजवटीची झोप उडाली.मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली 'छोडो भारत'ची गर्जना आणि दिलेला 'करा किंवा मरा '' ही घोषणा केली.  9 ऑगस्ट क्रांती  संपूर्ण देशात पसरली होती. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. करा किंवा मरा या घोषणेचा लोकांवर अशा प्रकारे प्रभाव पडला की इंग्रजांना भारत सोडावा लागला. चळवळ सुरू करताना गांधीजी म्हणाले की ब्रिटिशांनी ताबडतोब भारत सोडावा.
 
देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''
 
ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले.

सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात देशभरातील लोक सहभागी झाले, ज्याने ब्रिटिश राजवटीची पाळेमुळे हादरली . महात्मा गांधींनी ग्वालिया टँक मैदानातून करा किंवा मरोचा नारा दिला होता, त्यामुळे संपूर्ण देश इंग्रजांविरोधात एकजुटीने उभा राहिला. नंतर ग्वालिया टँक मैदानाचे नामकरण ऑगस्ट क्रांती मैदान असे करण्यात आले.
 
भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 9 ऑगस्ट रोजी ब्रिटिश सरकारने शेकडो लोकांना अटक केली. यात गांधीजींचाही सहभाग होता . या दरम्यान अनेक लोक मारले गेले. भारत छोडो आंदोलनात ज्यांनी प्राण गमावले त्यांना दरवर्षी श्रद्धांजली वाहिली जाते.








Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात हिंदी अनिवार्य वरून राज ठाकरेंचा राज्य सरकारला निषेध करण्याचा उघड इशारा

राज्यात हिंदी अनिवार्य वरून राज ठाकरेंचा राज्य सरकारला निषेध करण्याचा उघड इशारा

हा माझ्यावर अन्याय आहे… ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यावर सुधाकर बडगुजर यांनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेवरून असलेल्या वादावर राज ठाकरे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र , केली ही मागणी

आग्राच्या सिकंदरा येथे यमुनेत बुडून 6 किशोरवयीन मुलींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments