Dharma Sangrah

अवकाशातही कचर्‍याची गंभीर समस्या

Webdunia
अवकाशात सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साठू लागला आहे. यामुळे तो वेळीच हटवण्यासाठी युरोपीय स्पेस एजन्सीने आंतरराष्ट्रीय सहकार्यांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. या कचर्‍यामुळे सध्या अवकाशात कार्यरत असलेल्या उपग्रहांना धोका निर्माण झाला आहे.
 
पृथ्वीवरील अनेक देशांनी मोठ्या संख्येने अवकाशात पाठवलेले उपग्रह आपल्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरत आहेत. याबरोबरच अनेक प्रकारचा कचराही फिरत आहे. अशा स्थितीत हा कचरा आणि उपग्रह यांच्यात टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास उपग्रहांचे मोठे नुकसान होईल अथवा ते निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
युरोपीय स्पेस एजन्सीचे प्रमुख यान वोएर्नर यांनी जर्मन शहर डार्मश्टाट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सांगितले की अवकाशातील कचरा हटवण्याचे काम जगातील कोणताही एक देश करू शकत नाही. ही समस्या गंभीर बनू लागल्याने सर्वांच्या सहकार्यांने तो हण्याची गरज आहे.
 
अवकाशात सध्या 7 लाख 50 हजार अशा लहान, मोठ्या वस्तू प्रचंड वेगाने फिरत आहेत. त्यांचा व्यास 1 ते 10 सेंटीमीटपर्यंतही असू शकतो. या वस्तू लहान असल्या तरी त्या अत्यंत धोकादायक ठरू शकतात. कारण, एखादा लहान तुकडाही मोठे विमान अथवा उपग्रहाला नष्ट करू शकतो. हा कचरा हटवण्याचा गेल्या वर्षी जपानने केलेल्या प्रयत्न अपयशी ठरला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

गॅस काळाबाजार करणाऱ्यांना अटक, २३ गुन्हे दाखल-मंत्री छगन भुजबळ

LIVE: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

सीसीटीव्हीमुळे महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments