Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

Webdunia
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:11 IST)
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकल्याचा अहवाल कॅनालिस या संस्थेने दिला आहे. या तिमाहीमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४.०४ कोटी इतकी होती. तर पहिल्या स्थानावर १०.०६ कोटींच्या स्मार्टफोनसह चीन पहिल्या स्थानावर आहे. याच कालावधीत अमेरिकी बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४ कोटी होती, त्यामुळे या कालावधीत झालेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र, स्मार्टफोन्सच्या खरेदीच्या बाबतीत चिनी बाजारपेठ भारतापेक्षा प्रचंड पुढे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
 
जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत स्मार्टफोन्सची विक्री ७.२ टक्क्यांनी घटून ३४.८९ कोटी इतकी झाली आहे. गेले चार महिने स्मार्टफोन्सच्या विक्रीत सातत्यानं घट होत आहे, असे कॅनालिसनं आपल्या अहवालात नमूद केले आहे.
 
ज्या तीन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे त्यामध्ये इंडोनेशिया (१३.२ टक्के वाढीसह ८९ लाख), रशिया (११.५ टक्के वाढीसह ८८ लाख) व जर्मनी (२.४ टक्के वाढीसह ५५ लाख) यांचा समावेश आहे. पहिल्या स्थानी असलेल्या चिनी बाजारपेठेतील मागणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत १५.२ टक्क्यांनी घटली तर भारतातली मागणी १.१ टक्क्यानं घटली आहे.
 
स्मार्टफोन उत्पादकांमध्ये सॅमसंग २०.४ टक्के बाजारातील हिश्शासह आघाडीवर आहे. त्यामागोमाग हुआवेई (१४.९ टक्के), अपल (१३.४ टक्के), शाओमी (९.६ टक्के) व ओप्पो (८.९ टक्के) या कंपन्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली, राजकारणाविरोधात मोहीम सुरू करणार

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

पुढील लेख
Show comments