Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनोखे डिवाईस, थम्ब करुन तिकिट मिळेल

Webdunia
रोजच बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुटे पैसे बाळगणे गरजेचे ठरते. अन्यथा गैरसोय होते. त्यामुळे आता पिंपरीतील प्रवाशांच्या सोयीसाठी थम्ब करुन तिकिट मिळेल असे अनोखे डिवाईस काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या प्राध्यपकाने तयार केले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आकुर्डी येथे राहणारे प्रा. आशिष पवार, किरण गिरासे (अमोदे), प्रथमेश भोसले, अनिकेत हडके यांनी मिळून ‘बायोमेट्रीक ई - सिस्टिम फॉर कॅशलेस टिकिटिंग मेन्टेनेन्स ऑफ ट्रान्सिट रेकॉर्ड इन बस ट्रान्सपोर्टेशन’ हे डिवाईस तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या सिस्टिममध्ये कंडक्टरकडे एक डिवाईस असणार आहे. ते शहरातील मेन डेपोंशी कनेक्टेड असणार आहे. बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टर कुठे जायचे हे विचारेल आणि डिवाईसवर थम्ब करण्यास सांगेल. थम्ब केल्यानंतर  प्रवाशाला तिकिटाचा एक मेसेज येईल आणि हाच मेसेज कंडक्टर आणि मेन डेपोच्या सर्व्हरला सेव्ह होईल. 
 
यामध्ये पैशाची देवाण -घेवाण कशी असेल याविषयी प्रत्येकाच्या मनात प्रश्‍न निर्माण होईल. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आता प्रत्येक आधारकार्डला अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर लिंक आहे. त्यामुळे जेव्हा प्रवासी थम्ब करेल तेव्हा जेवढ्या रकमेचे तिकिट असेल तेवढी रक्कम डायरेक्ट कंटक्टरच्या डिवायसमध्ये किंवा सर्व्हरला जमा होईल. हा मेसेज प्रवासी व कंटक्टरकडे असणार्‍या डिवाईसमध्ये आणि मेन डेपोच्या सर्व्हरला सेव्ह होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments