suvichar

सावधान : आता व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये राहणार पोलिस

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:37 IST)
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे समाजात पसरत असलेली तेढ. छोट्या कारणांनी होणारे खून, अफवा आणि इतर गोष्टीवर आळा घातला जाणार आहे. इतकी समाज जागृती करून सुद्धा कोणताही फरक पडत नाही त्यामुळे हे पाऊल सरकारने उचलले आहे. राज्यात एक अफवा मुळे जीवघेण्या 11 घटना.घडल्या आणि  7 जणांची हत्या झाली तर  16 जण जखमी झाले आहेत. कोणतीही शहानिशा न करता मेसेज एका सेकंदात फॉरवर्ड होतो. पण त्याचे परिणाम काय होतील याचा कुणीही विचार करत नाही. म्हणूनच आता महाराष्ट्र पोलिसांनी ही नामी युक्ती काढली आहे. राज्यातील जवळपास सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना अधिकात अधिक अश्या सर्व व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत. आकडेवारीनुसार जगभरातले यूजर्स रोज 6 हजार कोटी मेसेज पाठवतात. त्यात भारत हा सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे समाज आणि पोलीसांनवर मोठी जबाबदारी असणार आहे. तुम्ही ही बातमी वाचत असला तो पर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये शहरातील पोलीस मामा आधीच शामिल झाले असतील त्यामुळे सावधानता बाळगा, अफवा पसरवू नका. समाजघातक गोष्टी पसरवू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

आले लागवड: अद्रक शेतीतून हमखास बंपर नफा मिळवण्याची संपूर्ण माहिती

India vs Ireland : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड संघ जाहीर

वाशिममध्ये तरुणाला जेवणासाठी बोलावून आर्थिक वादातून हत्या; चार आरोपींना अटक

पाणीटंचाईवर मुंबई उच्च न्यायालयाची कठोर भूमिका; सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

पुढील लेख
Show comments