Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिलायन्स जिओ कंपनी देणार अवघ्या 50 पैशात इंटरनॅशनल कॉलिंगची सुविधा

Webdunia
सोमवार, 14 मे 2018 (11:04 IST)
रिलायन्स जिओने वर्षभरापूर्वी टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश करत धक्का दिला होता. जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवसांपूर्वी जिओने आपला फोन बाजारात दाखल करत टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक धक्का दिला होता. त्यानंतर ग्राहकांना विविध ऑफर्स देत सातत्याने आकर्षिक करण्यात जिओ यशस्वी झाले आहे.
 
सध्या परदेशात राहणार्‍यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कंपनीने या ग्राहकांसाठी एक खास ऑफर नुकतीच जाहीर केली आहे. 15 मे म्हणजेच येत्या मंगळवारपासून हा नवीन प्लॅन सुरु होणार असून यामध्ये अतिशय कमी दरात तुम्हाला परदेशात असलेल्या आपल्या जवळच्या व्यकतीशी संवाद साधता येणार आहे.
 
यामध्ये कॉलिंगसाठीचा दर प्रतिमिनिट 50 पैसे इतका ठेवण्यात आला असून रोमिंग 2 रुपये प्रतिमिनिट असेल. जिओच्या पोस्टपॅड प्लॅनचाच एक भाग असलेली ही नवीन सुविधा ग्राहकांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. या प्लॅनची बेसिक रक्कम 199 रुपये इतकी असून ही रक्कम ग्राहकांना दरमहा भरावी लागेल. विशेष म्हणजे आपल्या नंबरवर इंटरनॅशनल कॉल सर्व्हिस सुरू करण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे सिक्युरीटीडिपॉझिट ठेवण्याची आवश्यकता नाही. या शानदार ऑफर्सद्वारे ग्राहक अमेरिका किंवा कॅनडाला 50 पैसे प्रतिनिट या दराने कॉल करु शकतात. तर बांगलादेश, चीन, फ्रान्स आणि लंडनमध्ये कॉल करण्यासाठी प्रतिमिनिट 2 रुपये खर्च करावा लागेल. इस्त्रायल, नायझेरिया, सौदी अरब, स्वीडन आणि अन्य देशात एक मिनिट बोलल्यास 6 रुपये प्रतिमिनिट खर्च येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रोमिंगसाठीही कोणताही नवीन डेटा प्लॅन घेण्याची आवश्यकता नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments