Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार आता व्हॉट्सअॅप वर बंधने आणणार दिला पहिला इशारा

Webdunia
बुधवार, 4 जुलै 2018 (09:37 IST)
व्हॉट्सअॅप हे आपल्या देशातील सर्वात मोठे बोला चालीचे एक माध्यम बनले आहे. त्यामुळे अनेक कामे सोपी होतात. मात्र हे व्हॉट्सअॅप आता माथेफिरू आणि समाज विघातक लोक वापरून समाजात द्वेष पसरवत आहे. तर चिथावणीखोर मेसेज पसरतात म्हणून अनेक लोक अडचणीत सापडून त्यांना जीव गमवावा लागला आहे. चिथावणीखोर मेसेजना पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजन करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला इशारा देताना म्हटले आहे की, फेसबुककडे मालकी हक्क असलेली कंपनी आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व टाळू शकत नाही. तुम्ही योग्य ती पावले उचला अन्यथा तुमच्यावर कारवाई करू असा सज्जड दम दिला आहे. सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या मेसेजमुळे देशातील विविध भागात जमावाकडून काही लोकांची हत्या झाल्या आहेत. त्यामुळे सरकार प्रचंड संतापले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटना ह्या दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणत या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळात ग्रुपचा अॅॅडमीन आणि वयक्तिक मेसेज पसरवणारे चांगलेच अडचणीत येणार आहे. सरकार याबाबत लवकरच कायदा आणणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments